बंद

    पंचायत समिती, बागलाण

    • atul patil
      श्री. अतुल जयवंतराव पाटील

      गट‍ विकास अधिकारी (उ.श्रे.)

      (संपर्क क्र. 9423329186)

    • vishwas sawant
      श्री. विश्वास वसंतराव सावंत

      सहायक गट विकास अधिकारी

      (संपर्क क्र. 9423019569)

    भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ: बागलाण तालुका पश्चिम घाटाच्या पर्वतांमध्ये वसलेला आहे . येथील प्रमुख नदी मौसम नदी (मोसम नदी) आहे. जी हरणबारी धरणावर बांधलेली आहे ज्यामुळे एक मोठा जलाशय तयार होतो. क्षेत्रफळ : १,४७७.८३ किमी  (५७०.५९ चौरस मैल).

     

    लोकसंख्या : भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार

    लोकसंख्या पुरुष स्त्री एकुण
    अ) अनु.जाती ९,६१८ ९,३८१ १८,९९९
    ब) अनु.जमाती ७६,१४४ ७३,७०२ १,४९,८४६
    क) इतर १,०७,३१० ९८,२८० २,०५,५९०
    एकुण १,९३,०७२ १,८१,३६३ ३,७४,४३५

     

    राजकीय माहिती :

    बागलाण विधानसभा मतदारसंघ – ११६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार बागलाण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचा समावेश होतो. बागलाण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे

    कृषी विभाग, पंचायत समिती बागलाण 

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते.

    या योजनेअंतर्गत-

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

     

    बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते. यामध्ये-

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

     

    योजनेच्या अटी व शर्ती:

    • शेतकऱ्याकडे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सक्षम प्राधिकार्‍याचा जातीचा दाखला असणे आवश्यक.
    • शेतकऱ्याकडे किमान क्षेत्र 0.40 ते जास्तीत जास्त 6.0 हे. असावे
    • अधिक संपर्कासाठी कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती कळवण यांच्याशी संपर्क करावा
    • जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% किंवा मर्यादित अनुदानावरती कृषी अवजारे बी बियाणे डीबीटी द्वारे खरेदी अनुदान योजना
    • राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस सयंत्रास अनुदान देणे
    • नैसर्गिक आपत्ती जळीत झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान योजना

      

    प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ इंदिरा आवास घरकुल योजना पंचायत समिती, बागलाण 

    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव रमाई घरकुल योजना
    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
    2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी अनुसूचित जातीचा असावार लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १००००/- पेक्षा कमी असावे ३) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा ४) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ५ स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखल करण्यात यावे
    3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती पात्रलाभार्थीना यांना त्यांच्याग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्याप्रमाणे ग्रापंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यानंतर मा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांचेकडून प्रस्तावत पासून लाभार्थी पात्रकरण्यात येतो त्यानंतरम प्रकल्पसंचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांचेकडून प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यास रक्कम रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) तीन हप्त्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामार्फत वाटप करण्यात येते.
    4 कार्यक्रमामध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन २४६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये २२००००- अक्षरी रुपये बावीराहजार मात्र मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते
    5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती

    प्रथम हप्ताअनुदान House Sanctioned

    व्दितीय हप्ताअनुदान Plinth Level

    तृतीय हप्ता अनुदान Lintal Level

    6 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम चौथा हप्ता / अंतिमहप्ता अनुदान Completed
    7 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    8 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती, बागलाण
    9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती, बागलाण

     

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

    नरेगा (MGNREGA) ही केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करणाऱ्या सदस्यांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणे आहे. या योजनेत ‘कामाचा अधिकार’ दिला जातो आणि ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवली जाते.

    मनरेगा अंतर्गत जलसंधारण, वनीकरण, सिंचन, जमीन विकास, आणि फलोत्पादन यांसारख्या अनेक कामांचा समावेश होतो, ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना किमान रोजगाराची हमी मिळते व कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होते. अकुशल शारीरिक काम करणाऱ्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट, मनरेगा अंतर्गत येणारी मुख्य कामे:जलसंधारण आणि जलसंचयन:समोच्च खंदक, समोच्च बंधारे, मातीचे बंधारे, स्टॉप बंधारे, भूमिगत बांध आणि स्प्रिंगशेड विकास यांसारख्या जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.

    नरेगा (MGNREGA) ही केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करणाऱ्या सदस्यांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणे आहे. या योजनेत ‘कामाचा अधिकार’ दिला जातो आणि ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवली जाते.

     

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना सदर योजना सर्व जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • शेततळे
    • फळ बाग लागवड
    • बैल गोठा, शेळी शेड, पोल्ट्री शेड,
    • शौषखडडा, नॅडेप, गांडुळ युनिट
    • इत्यादी

    सार्वजनिक स्वरुपाचे सर्व कामे

    • सार्वजनिक रस्ता तयार करणे
    • सार्वजनिक वृक्ष लागवड
    • अभिसरण सार्वजनि शौचालय
    • दुष्काळ निवारण वृक्ष लागवड
    • जलसंधार संबंधीत कामे
    • भुमीगत बांध
    • इत्यादी
    • ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना विभाग, बागलाण
    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटीवशर्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत वार्षिक नियोज कृती आराखडा ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेव्दारे ठरावनुसार निवड करण्यात येते.
    2 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती सदर योजनाचा लाभा घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायत स्तरावरुन परिपूर्ण चेक लिस्ट  नुसार तालुका स्तरावर पडताळणी करून मंजुर करण्यांची कार्यपध्दती वापरली जाते.
    3 कार्यक्रमामध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती सर्व सार्वजनिक कामे व वैयक्तिक कामे नुसार प्रत्येक लाभासाठी मापदंडानुसार अनुदान अदा केले जाते.सदर अनुदानाचे कार्यपध्दीती  ऑनलाईन प्रणाली व्दारे वितरित केली जाते.
    4 अनुदान वाटपाची कार्यपद्धती मग्रारोहयो अंतर्गत कोणतेही काम सुरु झाल्यानंतर मजुरी व कुशल स्वरुपात अनुदान वाटप केले जाते. (ऑनलाईन प्रणाली व्दारे)
    5 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम काम पुर्णत्वाचे दाखला अनुदान Completed
    6 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    7 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती, बागलाण
    8 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती, बागलाण

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती-पंचायत समिती, बागलाण (पहा/डाउनलोड करा)

    ऐतिहासिक वैशिष्ट्ये : बागलाण तालुक्याला पुरातन काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. बागलाण तालुक्यात इ.स. १३०० ते १७०० या कालखंडात बागुल घराण्यातील राजे राज्य करीत होते. त्यांच्या नावावरून या प्रदेशाला बागलाण हे नांव पडले. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून या तालुक्यात परतीला निघाले होते. त्यावेळी साल्हेर मुल्हेरची लढाई झाली. या लढाईचा “Rise of the Maratha Power” या पुस्तकात रानडेंनी उल्लेख केला आहे. बागलाण संतांची भूमी आहे. वैकुंठवासी यशवंतराव महाराजांनी भीषण दुष्काळात दामाजी पंतासारखी भूमिका बजावून भूकेलेल्यांना अन्न दिले, जनावरांचे प्राण वाचविले. त्यांनी देवमामलेदार म्हणून नांव भूषविले.

    सामाजिक वैशिष्ट्ये : बागलाण तालुक्यातील समाज १७१ गावांमध्ये विखूरला आहे. सामाजिक रचनेनुसार ६६ गावातील आदिवासी समाजामुळे आदिवासी गावे १०५ गावात बिगर आदिवासी समाज असे दोन विभाग पडले आहेत. बागलाणची प्रमुख बोलीभाषा अहिराणी आहे. आदिवासी भागात आदिवासी, कोकणी, भिल्ल इ. पोटभाषा आहेत. बागलाण तालुक्यात प्रामुख्याने शेती हा मुख्य व्यवसाय आहे तसेच पशुपालन, कुक्कुट पालन, घोंगड्या विणने, फडक्या रंगविणे हेव्यवसाय परंपरागत आहेत. बागलाणचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक नरहर गोपाळ शेठ व त्यांचे सहकारीयांनी सामाजिक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.

    बागलाण तालुक्यात ठेंगोडा येथे सूतगिरणी, शेवरे येथे साखर कारखाना कार्यरत आहेत. बागलाण तालुक्यात हिंदू, मुसलमान, जैन इ. मुख्य धर्मातील लोक गुण्या गोविंदाने एकत्र वास्तव्य करतात. सामाजिक परंपरेनुसार सण व उत्सव साजरे केले जातात. त्यात सटाणा येथे देवमामलेदार, मुल्हेर येथे “रासक्रिडा” हे उत्सव होतात.

    बागलाणसटाणा तालुका : भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती :

    भौगोलिक वैशिष्ट्ये : बागलाण (सटाणा) तालुक्याचे क्षेत्रफळ १६१४.५ चौ.की.मी. असून बागलाणच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगा पसरलेल्या असून साल्हेरचा किल्ला, मुल्हेरचा किल्ला, तिळवण किल्ला, मांगीतुंगीचे डोंगर, असा विस्तृत डोंगराळ परिसर आहे. बागलाण तालुक्यातून आरम व मोसम ह्या प्रमुख नद्या वाहतात. आरम नदीवर, केळझर येथे धरण बांधलेले असून त्याचा बागायती शेतीसाठी उपयोग होतो. मोसम नदीवर हरणबारी येथे धरणबांधलेले असून त्याचा डावा व उजवा कालवा काढलेला आहे. त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. बागलाणच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ असल्यामुळे तेथे आदिवासी लोक राहतात. त्याभागात वाड्यापाडे नव्वदच्या आसपास असल्याने वस्ती शाळा हा उपक्रम फायद्याचा ठरतो. बागलाणच्या पूर्वेकडील भाग सखल व सुपीक जमिनीचा आहे. या भागात ऊस व कांदा हीबारमाही पिके घेतली जातात. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष व डाळींब बागा विकसितकेल्या आहेत. तसेच बाजरी, भुईमूग, मका, कपाशी, गहू व हरबरा इ. पिके घेतली जातात.

    सांस्कृतिक वैशिष्ट्ये :हा तालुका सांस्कृतिक परंपरे बाबत नाशिक जिल्ह्यात प्रसिध्द आहे. भारतात मथुरेनंतर कोजागिरी पौर्णिमेस होणारी रासक्रिडा व आदिवासी नृत्य मुल्हेर येथे होते. श्रीक्षेत्र दोधेश्वर, भिमाशंकर, या ठिकाणी शिवलिंग आहे तसेच देवळा ते अलियाबाद या ठिकाणी हेमाडपंथी देवालय असून त्याचे कोरीव काम अप्रतिम आहे. बागलाण तालुक्यात शैक्षणिक सुविधा जि.प. प्राथमिक शाळा, उर्दु शाळा, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, पोस्टबेसिक आश्रम शाळा, महाविद्यालये, कला विद्यालये, इंग्रजी माध्यम शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यात सर्वधर्माचे लोकशिक्षण घेतात. शालेय कार्यक्रमात सर्व धर्मातील सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी यात सर्व विद्यार्थी सहभागी होतात.

    देव मामलेदार : देव मामलेदार तथा यशवंत महादेव भोसेकर (१३ सप्टेंबर१८१५ : भोसेपंढरपूर – २७ डिसेंबर१८८७ : नाशिक) हे एक हिंदू संत होते. इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवलाचाळीसगावएरंडोलअमळनेरशहादाधुळेशिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.

    साल्हेर किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली आणि सह्याद्रीचा सर्वात उंच साल्हेर जिंकला ! साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

    मुल्हेरचा किल्ला :मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटी पासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेरला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात.

    मांगीतुंगी किल्ला :मांगी-तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे.

    पिसोळ :पिसोळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे.

    ई मेल आईडी : bdobaglan@gmail.com

    गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक : ९४२३३२९१८६

    सहायक गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक : ९४२३०१९५६९

    पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक : ०२५५५-२२३०१५