बंद

    पंचायत समिती, कळवण

    • Ramesh Wagh BDO
      श्री. रमेश ओंकार वाघ

      गट‍ विकास अधिकारी (उ.श्रे.)

      (संपर्क क्र. 9881983055)

    • vandana sonawaneABDO
      श्रीमती वंदना दशरथ सोनवणे

      सहायक गट विकास अधिकारी

      (संपर्क क्र. 9763078443)

    वैशिष्ट्ये :

    सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. मुख्य व्यवसायशेती असून गिरणा, पुनद, बेहडी व तांबडी नद्यांनी सुजलाम् सुफलाम् केले आहे. येथे चणकापूर,पुनद धनोली भेगू ही धरणे असून नागली, भात, मका, गहू, कांदा  बरोबरच भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. सामाजिक वनीकरणाच्या साह्याने डोंगराळ भागात वृक्षराजी दिसून येतात. शेती बरोबरच मासेमारी, हस्तकला, व्यापार, पशुपालन याद्वारे विकास होत आहे. आई सप्तशृंगी मातेची छाया तालुक्यावर आहे. मुख्यत्वे येथे आदिवासी समाज. पण सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अहिराणी, कोकणी, भिलावू, ह्या भाषा तर दिवाळी, होळी, पोळा, डोंगरी देव हे प्रमुख सण आहेत. लोक कष्टाळू व अंधश्रद्धाळू आहेत. महिला बचतगट, बँका, पोस्ट, दवाखाना, याद्वारे जीवनमान उंचावत आहे. कलापथके, भजनीमंडळे, लोकनाट्य याद्वारे सामाजिक जागृती होत आहे. सप्तशृंगी गडावर चैत्री शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा व नवरात्रात कोजागिरी पर्यंत यात्रा भरते. नवरात्रात गावोगावी चक्रपूजा केली जाते. कलावती आई, स्वामी समर्थ केंद्र हे समाजप्रबोधन कार्य करतात. हिंदू, मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतात. एक गाव एक पानवठा राबविला जातो. त्यामुळे जातीभेद पाळत नाहीत, भोवाडा पद्धतीत सोंगे नाचवून रामलीला, पांडव प्रताप दाखवतात. विविधतेने नटलेली भूमी आहे. पेशवे कालीन रघुनाथराव यांना अटक करून शिक्षा दिली तो धोडप किल्लाजवळच आहे. चाचेर किल्ल्यापासून भुयारी मार्गाने धोडप किल्ल्यावर जात असत. जयदरचे सिद्धेश्वर मंदिर, देवळी कराडचे हेमाडपंथी महादेव मंदिर, खेडगावचा स्वयंभू गणेश मदिर, भेंडी येथील दत्तमंदिर, पेमगीर डोंगरावर शिवकालीन तलाव व पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्यासाठी व जंगल सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक चणकापूर येथे आहे. सप्तशृंग गडावर शितकडा,कालीकुंड, सूर्यकुंड प्रसिद्ध आहेत. जवळच मार्कंड ऋषींचे मंदिर प्रसिद्ध आहे.

    धरणे : कळवण तालुक्या पासून २४ ते २५ कि.मी अंतरावर अभोण्या जवळून ५ ते ६ की.मी दूर चनकापूर हे धरण आहे फार प्राचीन काळापासून हे धरण बांधण्यात आले आहे व थोड्याच अंतरावर स्वर्गवासी माजी आमदार कळवण तालुक्याचे पानदेव कै.ए. टी.पवार यांनी लोकांसाठी बांधलेला अर्जुन सागर हा धरण जयदर जवळ सुपले गावाजवळ आहे या धरणाला स्वतः ए. टी.पवार अर्जुन तुळशीराम पवार यांचं नाव अर्जुन सागर म्हणून देण्यात आलेलं आहे.

    कळवण तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे आदिवासी लोकसंख्येचा असून, येथे सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर व धोडप किल्ला, मोहंदर  किल्ला  यांसारखी  धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. तालुक्यातील भूभाग उंचसखल असून, पश्चिमेला गुजरात राज्याची सीमा आहे. येथील लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतीपूरक उद्योग आहे. ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, कृषी व महिला-बालकल्याण या क्षेत्रात पंचायत समिती कळवण महत्त्वाची भूमिका बजावते.

    भौगोलिक स्थान:

    • कळवण नाशिकपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे.
    • हा तालुका सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेला आहे.
    • येथील भूभाग उंचसखल आणि डोंगराळ आहे.
    • येथे बेहाडी आणि गिरणा नद्यांचा संगम होतो.

     

    लोकसंख्या आणि संस्कृती: 

    • या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात.
    • २०११ च्या जनगणनेनुसार, तालुक्यात १५२ महसुली गावे आहेत.
    • कळवण तालुक्याचे क्षेत्रफळ 86400 हे.
    • कळवण तालुक्यात एकुण 86 ग्रामपंचायती आहेत.
    • कळवण तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 09 व उपकेंद्र 49 आहेत.
    • कळवण तालुक्यात पशु चिकीत्सालय श्रेणी 01- 10  व प्रथम उपचार पशु केंद्र श्रेणी 02 चे 04आहेत.
    • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 203  आहेत.

     

    लोकसंख्या : भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार

    लोकसंख्या

    पुरुष स्त्री एकुण
    106130 102232 208362
     
    ) अनु.जाती 7095
    ) अनु.जमाती 143667
    ) इतर 57600
    एकुण 208362

    सप्तशृंगी गड : हे सप्तशृंगी देवीचे एक प्रसिद्ध धार्मिक देवस्थान असून, कळवणपासून सुमारे २२ किमी अंतरावर आहे.

    धोडप किल्ला : हा एक लोकप्रिय गिर्यारोहण स्थळ आणि महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे.

    राजकीय माहिती :  कळवण / सुरगाणा  विधानसभेचा क्रमांक 117 आहे; विधानसभेची स्थापना 1962 मध्ये झाली. कळवण हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग  आहे.

    कृषी विभाग, पंचायत समिती कळवण

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते.

    या योजनेअंतर्गत-

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

     

    बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते. यामध्ये-

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

     

    योजनेच्या अटी व शर्ती:

    • शेतकऱ्याकडे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सक्षम प्राधिकार्‍याचा जातीचा दाखला असणे आवश्यक.
    • शेतकऱ्याकडे किमान क्षेत्र 0.40 ते जास्तीत जास्त 6.0 हे. असावे
    • अधिक संपर्कासाठी कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती कळवण यांच्याशी संपर्क करावा
    • जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% किंवा मर्यादित अनुदानावरती कृषी अवजारे बी बियाणे डीबीटी द्वारे खरेदी अनुदान योजना
    • राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस सयंत्रास अनुदान देणे
    • नैसर्गिक आपत्ती जळीत झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान योजना

      

    प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ इंदिरा आवास घरकुल योजना पंचायत समिती, कळवण

    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव रमाई घरकुल योजना
    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
    2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी अनुसूचित जातीचा असावार लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १००००/- पेक्षा कमी असावे ३) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभमिळालेला नसावा ४) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ५ स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्रदाखलकरण्यात यावे
    3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती पात्रलाभार्थीना यांना त्यांच्याग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्याप्रमाणे ग्रापंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यानंतर मा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांचेकडून प्रस्तावत पासून लाभार्थी पात्रकरण्यात येतो त्यानंतरम प्रकल्पसंचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांचेकडून प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यास रक्कम रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) तीन हप्त्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामार्फत वाटप करण्यात येते.
    4 कार्यक्रमामध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन २४६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये २२००००- अक्षरी रुपये बावीराहजार मात्र मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते
    5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती

    प्रथम हप्ताअनुदान House Sanctioned

    व्दितीय हप्ताअनुदान Plinth Level

    तृतीय हप्ता अनुदान Lintal Level

    6 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम चौथा हप्ता / अंतिमहप्ता अनुदान Completed
    7 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    8 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती. कळवण
    9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती.  कळवण

     

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना

    नरेगा (MGNREGA) ही केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करणाऱ्या सदस्यांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणे आहे. या योजनेत ‘कामाचा अधिकार’ दिला जातो आणि ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवली जाते.

    मनरेगा अंतर्गत जलसंधारण, वनीकरण, सिंचन, जमीन विकास, आणि फलोत्पादन यांसारख्या अनेक कामांचा समावेश होतो, ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना किमान रोजगाराची हमी मिळते व कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होते. अकुशल शारीरिक काम करणाऱ्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट, मनरेगा अंतर्गत येणारी मुख्य कामे:जलसंधारण आणि जलसंचयन:समोच्च खंदक, समोच्च बंधारे, मातीचे बंधारे, स्टॉप बंधारे, भूमिगत बांध आणि स्प्रिंगशेड विकास यांसारख्या जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.

    नरेगा (MGNREGA) ही केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करणाऱ्या सदस्यांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणे आहे. या योजनेत ‘कामाचा अधिकार’ दिला जातो आणि ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवली जाते.

     

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना सदर योजना सर्व जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत

    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • शेततळे
    • फळ बाग लागवड
    • बैल गोठा, शेळी शेड, पोल्ट्री शेड,
    • शौषखडडा, नॅडेप, गांडुळ युनिट
    • इत्यादी

    सार्वजनिक स्वरुपाचे सर्व कामे

    • सार्वजनिक रस्ता तयार करणे
    • सार्वजनिक वृक्ष लागवड
    • अभिसरण सार्वजनि शौचालय
    • दुष्काळ निवारण वृक्ष लागवड
    • जलसंधार संबंधीत कामे
    • भुमीगत बांध
    • इत्यादी
    • ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना विभाग कळवण
    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटीवशर्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत वार्षिक नियोज कृती आराखडा ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेव्दारे ठरावनुसार निवड करण्यात येते.
    2 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती सदर योजनाचा लाभा घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायत स्तरावरुन परिपूर्ण चेक लिस्ट  नुसार तालुका स्तरावर पडताळणी करून मंजुर करण्यांची कार्यपध्दती वापरली जाते.
    3 कार्यक्रमामध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती सर्व सार्वजनिक कामे व वैयक्तिक कामे नुसार प्रत्येक लाभासाठी मापदंडानुसार अनुदान अदा केले जाते.सदर अनुदानाचे कार्यपध्दीती  ऑनलाईन प्रणाली व्दारे वितरित केली जाते.
    4 अनुदान वाटपाची कार्यपद्धती मग्रारोहयो अंतर्गत कोणतेही काम सुरु झाल्यानंतर मजुरी व कुशल स्वरुपात अनुदान वाटप केले जाते. (ऑनलाईन प्रणाली व्दारे)
    5 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम काम पुर्णत्वाचे दाखला अनुदान Completed
    6 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    7 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती. कळवण
    8 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती.  कळवण

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती-पंचायत समिती, कळवण (पहा/डाउनलोड करा)

    ई मेल आईडी : bdokalwan@gmail.com

    गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक : 9881983055

    सहायक गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक : 9763078443