परिचय
नाशिक जिल्हा परिषदेविषयी –
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेची रचना –
स्थापना : १ मे, १९६२
रचना
- निवडलेल्या सभासदांची संख्या : ७३
- निवडलेल्या स्त्री सभासदांची संख्या : ३७
- स्वीकृत सभासदांची संख्या : निरंक
- पंचायत सभासदांची संख्या : १५
- त्यापैकी जे जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सभासद संख्या : निरंक
- नोंद ’अ’ मध्ये नमूद केली असतील ते : – –
- सहभागी करून घेण्यात आलेल्या सभासदांची संख्या (शासनाने अधिसूचित केलेल्या निरनिराळया सोसायटींचे अध्यक्ष ) : निरंक
- एकूण सभासदांची संख्या : ८८
नाशिक जिल्हा परिषद : इतर माहीती –
- २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या : ४९,८७,९२३
- नागरी : १९,३७,००२
- ग्रामीण : ३०,५०,९२१
- जिल्हयातील एकूण तालुके : १५
- त्यापैकी ग्रामीण भागातील एकूण तालुके : १५
- एकूण पंचायत समिती : १५
- जिल्हयातील एकू ण गावे : १,९२७
- जिल्हयातील एकूण ग्रामपंचायती : १,३७६
- जिल्हयातील हवामान व तापमान : नाशिक जिल्हयाचे हवामान सर्वसाधारण उष्ण व विषम स्वरूपाचे असून, उन्हाळयात हवामान
- सामान्यत: उष्ण असून, तापमान सुमारे ३८ ते ४० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असते.
- जिल्हयातील पर्जन्यमान : जिल्हयाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००४.९ से.मी. आहे.