बंद

    यशोगाथा

    ‘सुपर ५०’ उपक्रम – क्लासरूमकडून करियरकडे

    जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून २०२२ मध्ये सुपर ५० उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड निवड परीक्षेद्वारे करण्यात येते. या विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी आणि जेईई अॅडव्हान्स परीक्षांसाठी निवासी स्वरूपात विशेष प्रशिक्षण दिले जाते. तसेच, निवास व भोजन व्यवस्थेसह नियमित आरोग्य तपासणीची सोय देखील केली जाते.

    सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९ जून रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग सुकर झाला.

    सन २०२३ मध्ये या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसह इतर मागास, दिव्यांग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची देखील निवड करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ११० वरून २२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे यश मिळवणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यात आपल्या गावाचा अभिमान ठरेल, यात शंका नाही.

    उपक्रमाची वैशिष्ट्ये:

    ✔ इयत्ता ११ वीतील विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात सीईटी, जेईई परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाते.
    ✔ २०२३ मध्ये व्याप्ती वाढवून इतर मागास, दिव्यांग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी समाविष्ट करण्यात आले.
    ✔ विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाते.
    ✔ सर्व विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षक व प्रशिक्षक उपलब्ध.
    ✔ विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि आरोग्य तपासणीची सुविधा.

    विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया:

    “घरची परिस्थिती बेताची असल्याने जेईई परीक्षेसाठी क्लास लावणे शक्य नव्हते. सुपर ५० उपक्रमामुळे निवासी प्रशिक्षण मिळाले. हा उपक्रम माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी ठरला.”
    — कु. अश्विनी सुभाष बोरसे, JEE Advance Rank (SC) – 968

    “सुपर ५० उपक्रमामुळे जेईई आणि जेईई अॅडव्हान्सबद्दल माहिती मिळाली. आता आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करणार.”
    — कु. हर्षदा संजय वाटाणे, JEE Advance Rank (ST) – 2263

     

                  मिशन भगीरथ प्रयास उपक्रम : जलसंधारणाचा अभिनव प्रयोग

    नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वार्षिक पर्जन्यमान समाधानकारक असूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहतो. या समस्येच्या मुळाशी जात नाशिक जिल्हा परिषदेने “मिशन भगीरथ प्रयास” उपक्रमाची सुरूवात केली. यामध्ये जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून १०२ गावांची निवड करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGS) माध्यमातून या गावांमध्ये आजपर्यंत ३०७ बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

    जलसंधारणासाठी व्यापक उपाययोजना

    या उपक्रमाअंतर्गत साखळी बंधाऱ्यांसोबत वृक्षारोपण, जल पुनर्भरण, शोषखड्डे, कंटूर ट्रेंच (CCT) यासारखे पूरक उपक्रम हाती घेण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यामुळे जलस्त्रोत बळकट होऊन गावे स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

    मिशन भगीरथ प्रयास उपक्रमाला राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार

    राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट शासकीय उपक्रमांची दखल घेऊन त्यांना “स्कॉच ग्रुप” या संस्थेच्या वतीने गौरविण्यात येते. यंदाच्या स्कॉच पुरस्कार स्पर्धेत देशभरातून ३०० प्रकल्पांनी सहभाग घेतला होता. नाशिक जिल्हा परिषदेचा “मिशन भगीरथ प्रयास” उपक्रम या स्पर्धेत विजेता ठरला आणि राष्ट्रीय स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

    जलसंधारणात स्वयंपूर्ण गावांची वाटचाल

    या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना जलसंपन्नतेच्या दिशेने मार्गदर्शन मिळाले आहे. जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे गावांतील भूजल पातळी वाढली असून पिण्याच्या आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

    राष्ट्रीय स्तरावर नाशिक जिल्ह्याचा गौरव

    “मिशन भगीरथ प्रयास” उपक्रमाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे नाशिक जिल्ह्याने देशभरातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

     

    • मिशन आत्मनिर्भर
    • प्रस्तावना

    समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्यभूत  सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध साधन साहित्याने परिपूर्ण कक्ष व मार्गदर्शन केंद्र म्हणजे समावेशित शिक्षण संसाधन कक्ष होय.

    या संसाधन कक्षामध्ये 0 ते 18 वयोगटातील प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व पूरक थेरपी व उपचारात्मक सेवा शैक्षणिक व वैद्यकीय मार्गदर्शन विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांच्यामार्फत करण्यात येते. दिव्यांग विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज भागविणारे एकमेव महत्त्वाचे केंद्र आहे.

    2) उद्दिष्ट

    1) विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश व शिक्षणाची सामान्य विद्यार्थ्यांबरोबर समान संधी उपलब्ध करून देणे.

    2) दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतंत्र्य आणि आत्मविश्वासाने आवश्यक दैनंदिन जीवनातील कौशल्य विकसित करणे.

    3) हे पात्र लाभार्थी दिव्यांग विदयार्थी व्यावसायिक दृष्टीने सक्षम होऊ शकतात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करणे व तशी संधी उपलब्ध करून देणे.

    4) तालुकास्तरावरच  संसाधन कक्षामध्ये  दिव्यांग विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच विविध साहित्य साधने व सुविधाचा  लाभ देणे.

    5) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना व त्यांच्या शिक्षकांना दैनंदिन कौशल्य व शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य करणे.

    6) प्रत्येक दिव्यागं विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे ही संकल्पना अधिक विकसित करून दृढ करणे.

    7)  जिल्हास्तरावरील संदर्भ सेवा व सुविधा आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे.

    • संसाधन कक्षाचे स्वरूप कामकाज.-

    1) संसाधन कक्षामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण घेणे कठीण जाते अश्या लाभार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम तयार करून त्यांना वैयक्तिक शैक्षणिक मार्गदर्शन करणे.

    2) वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम  राबविण्यासाठी वेळापत्रक व गरजेनुसार उपचारात्मक सेवा देणे.

    3) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केलेले  शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेणे.

    4) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अपंग प्रकार निहाय तसेच अपंगत्वाची तीव्रता लक्षात घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन शैली व क्षमतांच्या आधारे,विषयाची काठीण्य पातळी निश्चित करून सुलभ अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडवून आणणे.

    WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.46 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.46WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.47 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.47WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.48 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.48WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.49WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.50 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.50WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.51 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 14.58.51WhatsApp Image 2025-01-03 at 15.02.16WhatsApp Image 2025-01-03 at 15.02.17 (1)WhatsApp Image 2025-01-03 at 15.02.17

    ‘कॉफी विथ सीईओ’ उत्कृष्ठ कामाची प्रेरणा

    जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागांतर्गत ग्रामीण भागात सेवा देत असतांना अधिकारी, कर्मचारी हे उत्कृष्ठ काम करत असतात अशा उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामाची माहिती इतरांपर्यंत पोहचावी व त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘कॉफी विथ सीईओ’ या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे.

    या उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागांतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आपण केलेल्या कामांची माहिती देतात, ग्रामीण भागात काम करत असतांना आलेले अनुभव, अडचणी व त्यावर केलेली मात हे कथन करतात, चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामातून इतर अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरणा मिळावी या हेतूने कॉफी विथ सिईओहा आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे.

    ‘कॉफी विथ सीईओ’ – नवीन ऊर्जेची नवी दिशा!

    ग्रामीण भागात सेवा देताना जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सातत्याने उत्कृष्ठ काम करतात. या मेहनतीचा उचित गौरव व्हावा आणि इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘कॉफी विथ सीईओ’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

    संवादातून प्रेरणा

    या उपक्रमांतर्गत, प्रत्येक विभागातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतात. त्यांनी केलेल्या कामाची माहिती देतात, ग्रामीण भागात काम करताना आलेले अनुभव, अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेल्या मात याबाबत चर्चा करतात. या अनौपचारिक चर्चेच्या माध्यमातून केवळ संवादच होत नाही, तर इतर कर्मचाऱ्यांनाही सकारात्मक ऊर्जा आणि नव्या कल्पनांची प्रेरणा मिळते.

    यशस्वी कामाचा गौरव

    या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः दखल घेतात व त्यांच्या योगदानामुळे ग्रामीण भागातील शासकीय सेवा अधिक प्रभावी आणि परिणामकारक कशी बनते, याचा वेध घेतला जातो.

    बदलाची नांदी

    ‘कॉफी विथ सीईओ’ हा उपक्रम केवळ गप्पांची बैठक नसून, प्रशासनात सकारात्मक बदल घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद वाढवून, उत्तम कार्यपद्धती शेअर करण्याचा आणि प्रशासन अधिक गतिमान करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे

     

    . WhatsApp Image 2025-03-12 at 00.26.07WhatsApp Image 2025-03-12 at 00.26.19WhatsApp Image 2025-03-12 at 00.29.39WhatsApp Image 2025-03-12 at 00.29.40WhatsApp Image 2025-03-12 at 00.29.41 (1)WhatsApp Image 2025-03-12 at 00.29.41

    ●      डिजिटल क्लासरूम – प्राथमिक शिक्षणात क्रांती

    • सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक वर्गखोल्यांना आधुनिक स्वरूप मिळून डिजिटल क्लासरूम ही संकल्पना उदयास आली आहे. ही प्रणाली विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी, सुलभ आणि मनोरंजक शिक्षण देण्यास मदत करते. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम संकल्पना राबविण्यात येत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

    ●      डिजिटल क्लासरूममध्ये काय असते?

    • डिजिटल क्लासरूममध्ये संगणक, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, इंटरनेट आणि डिजिटल साधनसामग्रीचा वापर केला जातो. यात व्हिडीओ लेक्चर्स, अॅनिमेशन, पुस्तके, ऑनलाइन चाचण्या आणि विविध शैक्षणिक अॅप्स चा उपयोग केला जातो. या साधनांमुळे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतात.

    ●      नाशिक जिल्ह्यातील डिजिटल शिक्षण उपक्रम

    • १२८ आदर्श शाळांना ९०४ टॅब्लेट (साहित्यासह) प्रदान करण्यात आले.
      ✔ २ शाळांना व्हर्च्युअल रिअॅलिटी सिस्टीम अंतर्गत ११ संच उपलब्ध करून दिले गेले.
      ✔ टॅब्लेटच्या सहाय्याने अध्ययन सुलभ होऊन अभ्यासातील कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सोप्या वाटू लागल्या आहेत.
      व्हर्च्युअल रिअॅलिटी सिस्टीमच्या मदतीने विज्ञान, इतिहास आणि भूगोलासारख्या विषयांतील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अभासी प्रतिमा आणि अनुभव वापरले जातात.
      ✔ या प्रणालींमुळे शिक्षण अधिक आनंददायी आणि सुलभ बनले आहे.

    ●      डिजिटल शिक्षणामुळे झालेला सकारात्मक परिणाम

    • 📌 टॅब्लेटच्या मदतीने अध्ययन अधिक आनंददायी झाले आहे, आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रुची निर्माण झाली आहे.
      📌 विद्यार्थी बुद्धिबळ, स्पेलिंग बी सारख्या स्पर्धांचा सराव टॅब्लेटच्या माध्यमातून करत आहेत.
      📌 स्वयंअध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टॅब्लेट अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
      📌 विविध लर्निंग अॅप्सच्या मदतीने भाषा कौशल्यांचा (वाचन, ऐकणे) विकास केला जात आहे.
      📌 गणितासारख्या विषयांच्या संकल्पना दृढ करण्यासाठी ऑनलाइन टेस्ट आणि सराव चाचण्या घेतल्या जातात.
      📌 व्हर्च्युअल रिअॅलिटी सिस्टीम आणि टॅब्लेट च्या वापरामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत अधिक मदत झाली आहे.
    • डिजिटल क्लासरूममुळे शिक्षण अधिक प्रभावी, अनुभव समृद्ध आणि तंत्रज्ञानस्नेही झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.

    WhatsApp Image 2024-04-03 at 1.36.08 PM (1)WhatsApp Image 2024-04-03 at 1.36.08 PMWhatsApp Image 2024-04-03 at 1.36.09 PM (1)WhatsApp Image 2024-04-03 at 1.36.10 PM (1)WhatsApp Image 2024-04-03 at 1.36.10 PMWhatsApp Image 2024-04-29 at 18.16.57WhatsApp Image 2024-04-29 at 18.18.45

           मिशन कामधेनु : पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट

    नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुधनाच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, काही दवाखान्यांच्या इमारती जुन्या झाल्या असून त्यांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून या दवाखान्यांचा कायापालट करण्याच नियोजन करण्यात आले.

    उद्दिष्टे आणि मिशन कामधेनुचा आरंभ

    ग्रामीण भागातील पशुधनास उत्कृष्ट आरोग्य सुविधा मिळाव्यात, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती व आधुनिकीकरण व्हावे, यासाठी “मिशन कामधेनु” हा उपक्रम सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आला आहे.

    🔹 तालुक्यांमधून आलेल्या प्रस्तावांमधून ६० दवाखान्यांची निवड करण्यात आली आहे.
    🔹 या पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नूतनीकरण करून त्यांना सुसज्ज आणि आधुनिक स्वरूप देण्यात येणार आहे.

    मिशन कामधेनु अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा

    ✔ ६० पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती दुरुस्त करून सुसज्ज केल्या जात आहेत.
    ✔ १५ तालुक्यातील १५ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.
    ✔ ५० दवाखान्यांमध्ये आवश्यक फर्निचर देण्याचे काम सुरू आहे.
    ✔ ६० पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी आझोला युनिट स्थापन केले जात आहे.
    ✔ ६० दवाखान्यांमध्ये माहिती फलक, संगणक संच आणि बोलक्या भिंतीच्या स्वरूपात पशुवैद्यकीय तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    तालुकानिहाय कायापालट होणारे दवाखाने

    📍 नाशिक – ६
     📍 येवला – ५
    📍 दिंडोरी – ५
    📍 मालेगाव – ४
    📍 निफाड – ५
    📍 नांदगाव – ४
    📍 इगतपुरी – ४
    📍 सिन्नर – ४
    📍 चांदवड – ३
    📍 बागलाण – ४
    📍 कळवण – ४
    📍 देवळा – २

    📍 पेठ – ३
    📍 सुरगाणा – ३
    📍 त्र्यंबकेश्वर – ४

    योजनेचा परिणाम

    🟢 पशुधनासाठी उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
    🟢 प्रयोगशाळांच्या माध्यमातून पशूंच्या रोगनिदान व उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.
    🟢 शेतकरी आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती मिळणार आहे.
    🟢 पशुवैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा होऊन पशुपालकांना जलद आणि सक्षम उपचार मिळणार आहेत.

    निष्कर्ष

    “मिशन कामधेनु” उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम होणार असून पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या आरोग्यासाठी आधुनिक आणि सुसज्ज दवाखाने उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम जिल्ह्याच्या कृषी व पशुपालन क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

     

    Picture1Picture2Picture3Picture4Picture5Picture6Picture7

    मिशन मॉडेल स्कूल – गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा अध्याय

    जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून मिशन मॉडेल स्कूल या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ६५० शाळांची निवड करून त्यांना आधुनिक, तांत्रिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

    मिशन मॉडेल स्कूलचे उद्दीष्टे

    ✅ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे.
    ✅ शाळेच्या पायाभूत सुविधा सुधारणे.
    ✅ डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे.
    ✅ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे.
    ✅ शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देणे.
    ✅ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे.

    मिशन मॉडेल स्कूलअंतर्गत शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम

    📌 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भौतिक सुविधांसाठी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्यामध्ये –

    • मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह (Multi Toilet Unit)
    • रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेल पुनर्भरण
    • किचन शेड आणि शोषखड्डा
    • वृक्ष लागवड (बिहार पॅटर्न) आणि गांडूळ खत निर्मिती
    • शाळेसाठी खेळाचे मैदान आणि गुणवत्तापूर्ण रस्ते
    • नाफेड कंपोस्ट आणि संरक्षक भिंतींचे बांधकाम

    तालुकानिहाय मॉडेल स्कूल्सची संख्यावाढ

    उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२८ शाळांची निवड करण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५२२ शाळा समाविष्ट करून एकूण ६५० शाळा या उपक्रमात सहभागी करण्यात आल्या आहेत.

    सुरू असलेली कामे आणि यशस्वी अंमलबजावणी

    ✅ पहिल्या टप्प्यातील १२८ शाळांमध्ये ५१५ कामे मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी ३३७ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.
    ✅ दुसऱ्या टप्प्यात ६५८ कामे प्रस्तावित करून आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
    ✅ जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून शाळांना ९०४ टॅब, गेम्स अँड अ‍ॅक्टिव्हिटी किट्स आणि १० virtual reality system वितरीत करण्यात आल्या आहेत.

    शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले उपक्रम

    📌 योगा आणि आनापान ध्यानसाधना
    📌 BALA (Building as a Learning Aid) संकल्पना
    📌 परसबाग निर्मिती आणि शालेय परिसर सौंदर्यीकरण
    📌 विद्यार्थ्यांसाठी विविध क्लब्स – स्पोर्ट्स क्लब, आर्ट क्लब, लिटरेचर क्लब इत्यादी

    भविष्यवेधी शिक्षण आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक कृतींचा अवलंब
    📌 निपुण भारत अंतर्गत निपुण विद्यार्थी आणि निपुण शाळा संकल्पना
    📌 विद्यार्थी संवाद आणि मंगळवारची चर्चा उपक्रम
    📌 स्पेलिंग बी, मॅथ बी आणि सेल्फी विथ सक्सेस उपक्रमांचा समावेश

    मिशन मॉडेल स्कूल – शिक्षणाच्या आधुनिकतेकडे एक मजबूत पाऊल

    या उपक्रमामुळे शाळांमध्ये भौतिक व तांत्रिक सुधारणा होऊन शिक्षण अधिक सुलभ, प्रभावी आणि परिणामकारक बनले आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने नाविन्यपूर्ण शिक्षण मिळत आहे, शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण मिळत असून शाळेचा सर्वांगीण विकास होत आहे. मिशन मॉडेल स्कूल हा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी एक आदर्श प्रकल्प ठरला आहे.

    तालुका निहाय मॉडेल स्कूलची संख्या

    .क्र. गटाचे नाव आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) .क्र. गटाचे नाव आदर्श शाळा (मॉडेल स्कूल)
    2023-24    टप्पा क्र.1 2024-25 टप्पा क्र. 2 एकूण 2023-24    टप्पा क्र.1 2024-25 टप्पा क्र.2 एकूण
    1 बागलाण 11 44 55 9 नाशिक 8 29 37
    2 चांदवड 5 20 25 10 निफाड 9 77 86
    3 देवळा 7 28 35 11 पेठ 8 24 32
    4 दिंडोरी 10 40 50 12 सिन्नर 6 26 32
    5 इगतपूरी 10 40 50 13 सुरगाणा 10 42 52
    6 कळवण 9 30 39 14 त्र्यंबकेश्वर 10 45 55
    7 मालेगाव 10 37 47 15 येवला 8 20 28
    8 नांदगाव 7 20 27 एकूण 128 522 650

     

    WhatsApp Image 2024-04-26 at 5.37.55 PM

    WhatsApp Image 2024-04-26 at 5.37.56 PMWhatsApp Image 2025-01-15 at 16.35.48WhatsApp Image 2025-01-15 at 16.36.37 (1)WhatsApp Image 2025-01-15 at 16.36.37

    जिल्हा परिषद साकारतेय मॉडेल व्हिलेज

    नाशिक जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्राधान्याने अभिसरणातून विविध योजना प्रभावीपणे कार्यान्वित केल्या जात आहेत.

    स्मार्ट व्हिलेज उपक्रमाची अंमलबजावणी

    स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारप्राप्त गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रत्येक तालुक्यातून तीन गावे निवडण्यात आली असून, एकूण ४५ गावांची निवड झाली आहे.

    योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतीशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार गावांच्या विकास आराखड्यांची रचना पूर्णत्वास येत आहे आणि स्मार्ट व्हिलेज संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे.

    तालुकानिहाय निवडलेली गावे

    • नाशिक – दरी, मुंगसरे, कोटमगाव
    • इगतपुरी – शिरसाठे, मोडाळे, नागोसली
    • त्र्यंबकेश्वर – वेळुंजे, काचुर्ली, आंबोली
    • पेठ – कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ
    • सुरगाणा – बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक
    • दिंडोरी – करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव
    • कळवण – सुळे, नांदुरी, मेहदर
    • बागलाण – पिंपळदरे, रातीर, नवे निरपुर
    • देवळा – वरवंडी, खालप, माळवाडी
    • चांदवड – राजदेरवाडी, हिरापुर, नन्हावे
    • मालेगाव – निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे
    • नांदगाव – बोराळे, श्रीरामनगर, भालुर
    • येवला – महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु.
    • निफाड – थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग
    • सिन्नर – वडांगळी, चिंचोली, दातली

    योजना आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे क्षेत्र

    या गावांमध्ये घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS), सर्व शासकीय इमारतींमध्ये शौचालय बांधणे आणि जल अंदाजपत्रक तयार करणे यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

    तसेच १००% घरांना नळजोडणी, वृक्षलागवड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन तसेच १००% पथदीप एलईडी / सौरऊर्जेवर कार्यान्वित करणे या महत्त्वाच्या बाबींवर भर दिला जात आहे. यासोबतच मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा यांची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण, आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड आणि दिव्यांग कार्ड यांचे १००% वाटप, तसेच सामाजिक लाभ योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

    संपूर्ण ग्रामविकासाची दिशा

    या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे गावांचा विकास अधिक प्रभावी होत असून स्मार्ट व्हिलेज संकल्पना यशस्वीपणे साकारली जात आहे.

      WhatsApp Image 2025-02-11 at 22.58.42 (1)WhatsApp Image 2025-02-11 at 22.58.42 (2)WhatsApp Image 2025-02-11 at 22.58.42WhatsApp Image 2025-02-11 at 22.58.43WhatsApp Image 2025-02-11 at 22.58.44WhatsApp Image 2025-02-11 at 23.06.24WhatsApp Image 2025-02-11 at 23.06.25 (1)WhatsApp Image 2025-02-11 at 23.06.25

     “स्मार्ट अंगणवाडी किट” – आधुनिक आणि आदर्श अंगणवाडीकडे वाटचाल

    महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी केंद्रांना अधिक आधुनिक आणि आदर्श बनवण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” या उपक्रमाची सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील 1007 अंगणवाडी केंद्रांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे.

    उद्दिष्ट आणि गरज

    एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” प्रदान करण्यात आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत 1007 अंगणवाडी केंद्रांना हे किट प्राप्त झाले आहे.

    स्मार्ट अंगणवाडी किटमुळे होणारे फायदे

    अंगणवाडी केंद्रांचा दर्जा सुधारणार:
     या उपक्रमामुळे अंगणवाडी केंद्रांचे पायाभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम होतील आणि त्यांचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये होईल.

    मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार:
     अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पूरक असे वातावरण मिळेल, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

    आधुनिक सुविधा आणि उपक्रम:
     या किटमध्ये शिक्षणात्मक साधने, खेळणी, पोषण आहारविषयी मार्गदर्शन करणारी साधने, आरोग्यविषयक साहित्य आणि विविध उपक्रमांसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

    स्मार्ट अंगणवाडी किटचे उद्दिष्टे

    🔹 मुलांना आनंददायी आणि आधुनिक वातावरणात पूर्व-शालेय शिक्षण देणे.
    🔹 मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे.
    🔹 किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे.
    🔹 शिक्षकांना अध्यापनास उपयुक्त असे साहित्य आणि साधनसंपत्ती उपलब्ध करून देणे.

    स्मार्ट अंगणवाडी किटमुळे शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल?

    📌 मुलांसाठी इंटरअॅक्टिव्ह लर्निंग साधने:
     चित्रे, आकृत्या आणि रंगीत साहित्य यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होईल.

    📌 शारीरिक आणि मानसिक विकास:
     खेळणी आणि विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळेल.

    📌 अंगणवाडी सेविकांसाठी मदत:
     या किटमुळे अंगणवाडी सेविकांना अध्यापन आणि पोषण यासंबंधी उपयुक्त साधने मिळतील, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल.

    निष्कर्ष

    “स्मार्ट अंगणवाडी किट” उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे आधुनिक आणि संसाधनयुक्त बनली आहेत. त्यामुळे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा आणि पोषण आहाराचे मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांचे रुपांतर खऱ्या अर्थाने आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये होत आहे.

     

    IMG_20241213_120020562_HDR_AEIMG-20241017-WA0012(1)IMG-20241017-WA0029IMG-20241017-WA0037IMG-20241214-WA0004IMG-20241214-WA0009IMG-20241214-WA0011IMG-20241214-WA0020IMG-20241214-WA0052IMG-20241214-WA0056IMG-20241214-WA0057IMG-20241214-WA0072IMG20241207103910 

     

     

     

     

     

     

    स्पर्धेद्वारे भाषा-प्राविण्य मिळवून देणारी ‘स्पेलिंग बी’

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी आणि शब्दसंग्रहात वाढ होऊन भाषा प्राविण्य मिळावे यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धांच्या धर्तीवर स्पेलिंग बी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सन २०२३-२४ च्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत प्रथमच या स्पर्धेचा समावेश करण्यात आला. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी ३२६५ जिल्हा परिषद शाळांमध्ये या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत २ लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.

    स्पेलिंग बी सोबत मॅथ्स बी – गणित विषयावर पकड निर्माण करणारी स्पर्धा

    • इंग्रजी प्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड वाढावी आणि त्यांची गणित विषय अध्यापनाची गती सुधारावी या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रथमच मॅथ्स बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांतर्गत घेण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. अतिशय कठीण गणितीय प्रश्न सहजरीत्या सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सिद्ध केले. या स्पर्धांमुळे इंग्रजी व गणित विषयाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असून भविष्यात अशा अधिकाधिक स्पर्धा आयोजित कराव्यात, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.

    स्पेलिंग बी वर्ल्ड रेकॉर्ड – एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

    • नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेत तब्बल ११,२२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ऐतिहासिक विक्रम नोंदवला. या अभूतपूर्व सहभागामुळे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याने स्थान मिळवले.
    • कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परिक्षक डॉ. चित्रा जैन यांनी हा विक्रम अधिकृतपणे घोषित केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल दोन्ही संस्थांकडून अधिकृत प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करण्यात आले.

    स्पर्धेचा सातत्यपूर्ण विस्तार

    • जून २०२३ पासून शाळा ते जिल्हास्तरीय स्तरावर स्पेलिंग बी स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी इंग्रजी व गणितासारख्या विषयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने तयारी करत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतील अशा दृष्टिकोनातून स्पर्धात्मक व नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचा हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.