बंद

    कृषी विभाग

    • संजय शेवाळे
      श्री. संजय आबाजी शेवाळे

      कृषी विकास अधिकारी

      (संपर्क क्र. ८३२९७३९७८३)

    भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेती उत्पादनवाढीची गरज 19व्या शतकातच जाणवू लागली. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः 1950 ते 1965 या कालावधीत शेती क्षेत्राचा विस्तार, सिंचनाखालील क्षेत्रवाढ, तसेच रासायनिक खतांचा वापर यावर भर देण्यात आला. याच काळात शेती विकासासाठी अबनेक योजना राबविण्यात आल्या.सन 1965-66 पासून संकरीत वाण निर्मितीमुळे देशात हरितक्रांतीचा पाया घालण्यात आला. त्यानंतरच्या पंचवार्षिक योजनांमध्ये सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचन या घटकांच्या वापरामुळे शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. कृषि विद्यापीठांमार्फत सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रात्यक्षिके, प्रचारसभा, मेळावे, प्रदर्शने अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

    अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असलो तरी केवळ स्वयंपूर्णतेपेक्षा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, व्यापारक्षम शेतीचा विकास करणे, निर्यात वाढविणे आणि कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जागतिक व्यापार व्यवस्थेचा लाभ घेऊन भारतीय शेतीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणे हे आजचे उद्दिष्ट ठरले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागात असलेल्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद कृषी विभाग महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते व औजारे शेतकऱ्यांना लक्षांक निहाय उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन दिले जाते.

    जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची रचना पुढीलप्रमाणे आहे – कृषी विकास अधिकारी हे विभागाचे सदस्य सचिव कार्यान्वित योजनांचे तसेच अधिनस्त जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) हे सेस निधीतून राबवल्या जाणाऱ्या योजनांचे नियंत्रण तसेच कर्मचारी आस्थापनाविषयक कामकाज, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांच्या मार्फत विशेष घटक योजनांची अंमलबजावणी तालुका स्तरावर केली जाते.

    कृषि विभागाचे व्हिजन आणि मिशन म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणे व कृषि क्षेत्राचा विस्तार करणे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून प्रभावीपणे राबविणे हे उद्दीष्ट आहे.कृषि विभागामार्फत सर्व हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशके यांचे गुणनियंत्रण आणि पुरवठा याबाबत  नियोजन केले जाते. नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मग्रारोहयो या योजनेतून तुती लागवड व रेशीम उद्योग हे उपक्रम राबव‍िण्यात येतात.नाशिक जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असून, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, शासकीय योजना, तसेच स्थानिक निधीतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्दिष्टातून शेतकऱ्यांना समृद्धीच्या दिशेने नेण्याचे कार्य हा विभाग यशस्वीपणे पार पाडत आहे.

    1.3 उद्दिष्टे

    1. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावून त्यांचे राहणीमान उंचावणे.

    2.शेतकऱ्यांना  आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.

    1. शेतकरी बांधवांना शेती व शेती पूरक क्षेत्रातून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे.
    2. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचिवणे.
    3. आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून त्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान उंचाविणे.
    4. शेतकऱ्यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे.
    5. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.
    6. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून प्रभावीपणे राबविणे.

    कृषि विभाग जिल्हा परिषद, नाशिक

    क्र. पदाचे नाव एकूण मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे शेरा
    1 कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक (गट अ) 1 1 0 सदरची पदे शासन स्तरावरून सरळसेवा अथवा पदोन्नतीने भरली जातात.
    2 जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) जि.प. नाशिक (गट ब) 1 1 0  
    3 जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) जि.प. नाशिक (गट ब) 1 0 1  
    4 मोहिम अधिकारी, जि.प. नाशिक (गट ब) 1 1 0  
    5 कृषि अधिकारी (गट ब) 24 16 8  
    6 कृषि अधिकारी (गट क) 4 4 0 कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र. कृषि-1418/प्र.क्र.410/16 दि. 09 जानेवारी 2019 अन्वये जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी (तांत्रिक) ह्या सर्वच पदे “मृतपद झालेली पदे” (सुपरन्युमरेरी) म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या संदर्भात भरती केली जाणार नाही.
    7 विस्तार अधिकारी (कृषि) (गट क) 40 37 3  
    8  सहाय्यक प्रशासन अधिकारी 1 1 0  
    9 कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1 1 0  
    10 सहाय्यक लेखाधिकारी 1 1 0  
    11 कनिष्ठ  लेखाधिकारी 0 0 0  
    12 वरिष्ठ सहाय्यक लेखा 1 0 1  
    13 वरिष्ठ सहाय्यक लिपिक 3 3 0  
    14 कनिष्ठ सहाय्यक लिपिक 4 4 0  
    15 कनिष्ठ सहाय्यक लेखा 1 1 0  
    16 वाहनचालक 1 1 0  
    17 परिचर 3 2 1  
      एकुण 88 74 14  

    अ) योजनेचे नाव – कृषि निविष्ठा व गुणवत्तानियंत्रण

    1. खते/बियाणे मागणी शासन स्तरावर करणे.
    2. शासनाकडून मंजूर केलेल्या आवंटनानुसार विविध खते व बियाणे कंपन्यांकडून कृषि निविष्ठा प्राप्त करून घेणे व आवश्यकतेनुसार जिल्ह्यात नियोजन करून वितरीत करणे.
    3. खतांच्या रेक पॉईंटवर नोडल अधिकारी म्हणून काम करणे.
    4. मंजूर आवंटनाप्रमाणे खते प्राप्त झाली आहेत की नाही, याबाबत समन्वय करणे व जिल्ह्यात आवश्यकतेप्रमाणे वितरण होईल याची दक्षता घेणे.
    5. साथी फेज-2 प्रणाली : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या सर्व कंपन्यांकडील बियाणे या प्रणालीतून पार पाडून घेणे व वितरण करणे.
    6. जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख म्हणून काम करणे.
    7. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचा गुणवत्तापूर्वक व रास्त दरात पुरवठा होण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
    8. ई-पॉस प्रणाली : शेतकऱ्यांना अनुदानीत रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी शासनाने तयार केलेल्या ई-पॉस प्रणालीवरून खतांची विक्री करण्याबाबत कार्यवाही करणे व मोहिम स्वरूपात ई-पॉस तपासणीचे नियंत्रण करणे.
    9. जिल्हास्तरीय नियंत्रण समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणे.
    10. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचा मागणीनुसार दर्जेदार व रास्त किंमतीत पुरवठा होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय नियंत्रण समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज करणे

    ) बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रातर्गत / क्षेत्राबाहेरील)

    योजनेचा उद्देश

    • अनुसूचित जमातीतील (आदिवासी) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
    • शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
    • आधुनिक कृषि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.

    लाभार्थी निवड व निकष

    1. लाभार्थी हा अनुसूचित जमातीतील शेतकरी असणे बंधनकारक.
    2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक.
    3. शेतकऱ्याचे नाव जमिनीच्या 7/12 दाखल्यावर व 8-अ उताऱ्यावर असणे आवश्यक.
    4. शेतकऱ्याकडे किमान 40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर जमीन असावी.
      • (दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींसाठी कमाल 00 हेक्टर धारणक्षेत्राची अट लागू नाही.)
    5. शेतकऱ्याचे बँक खाते असणे व ते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक.
    6. लाभार्थी निवडीसाठी प्राधान्यक्रम :
      • दारिद्र्यरेषेखालील शेतकरी
      • आदिम जमातीचे शेतकरी
      • वैयक्तिक वनहक्क पट्टाधारक शेतकरी
    7. एका लाभार्थ्यास खालीलपैकी फक्त एकाच घटकाचा लाभ देता येईल :
      • नवीन विहीर
      • जुनी विहीर दुरुस्ती
      • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण

    लाभार्थी निवडीची कार्यपध्दती- लाभार्थी निवडीसाठी सदर योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbthait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन करावा.

    योजनेचे स्वरूप/ माहिती-

    अ.क्र. बाब अनुदानाची मर्यादा (रुपये)
    1 नविन सिंचन विहीर 4,00,000/-
    2 जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/-
    3 इनवेल बोअरींग 40,000/-
    4 वीज जोडणी आकार 20,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाचा आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    5 शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण 2,00,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाचा 90% यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    6 HDPE/ PVC पाईप 50,000/- किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    7 सूक्ष्म सिंचन संच (पुरक अनुदान)
    अ-ठिबक सिंचन या योजनेतून अल्प-अल्पभूधारक 90% / बहुभूधारक 75% किंवा रु. 97,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    ब-तुषार सिंचन या योजनेतून अल्प-अल्पभूधारक 90% / बहुभूधारक 75% किंवा रु. 47,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    8 यंत्र सामुग्री (बैलचलित/ट्रॅक्टर चलितवजारे) 50,000/-
    9 परसबाग 5,000/-
    10 विधन विहीर 50,000/- किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.

     

    ) योजनेचे नाव- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    योजनेचा उद्देश-

    • अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
    • सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
    • आधुनिक कृषि पध्दतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.

    लाभार्थी निवड व निकष-

    • लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असणे बंधनकारक आहे.
    • शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकारीने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    • शेतकऱ्यांचे नाव जमिन धारणेचा 7/12 दाखला व 8-अ उतारावर असणे आवश्यक आहे.
    • सदर शेतकऱ्यांकडे किमान 40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर एवढी (दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6.00 हेक्टर धारणक्षेत्राची अट लागू नाही) शेतजमीन असेल.
    • लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
    • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील.
    • एका लाभार्थ्यास नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळयाचे प्लॉस्टिक अस्तरीकरण यापैकी फक्त एकाच घटकाचा लाभ देता येतो.

    लाभार्थी निवडीची कार्यपध्दती- लाभार्थी निवडीसाठी सदर योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbthait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन करावा.

    योजनेचे स्वरूप/ माहिती-

    अ.क्र. बाब अनुदानाची मर्यादा (रुपये)
    1 नविन सिंचन विहीर 4,00,000/-
    2 जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/-
    3 इनवेल बोअरींग 40,000/-
    4 वीज जोडणी आकार 20,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाचा आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    5 शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण 2,00,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाचा 90% यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    6 HDPE/ PVC पाईप 50,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाचा आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    7 सूक्ष्म सिंचन संच (पुरक अनुदान)
    अ-ठिबक सिंचन या योजनेतून अल्प-अल्पभूधारक 90% / बहुभूधारक 75% किंवा रु. 97,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    ब-तुषार सिंचन या योजनेतून अल्प-अल्पभूधारक 90% / बहुभूधारक 75% किंवा रु. 47,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    8 यंत्र सामुग्री (बैलचलित/ट्रॅक्टर चलितवजारे) 50,000/-
    9 परसबाग 5,000/-
    10 विधन विहीर 50,000/- किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.

     

    ) योजनेचे नाव-जिल्हा परिषद सेस योजना

    योजनेचा उद्देश

    • शेतीसाठी लागणारी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा शेती प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करणे.
    • आधुनिक अवजारे वापरून मजुरीवरील खर्च कमी होतो व वेळ वाचतो. आधुनिक कृषि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.

    लाभार्थी निवड व निकष-

    • लाभार्थी शेतकऱ्यांचा विहीत नमुन्यातील मागणी अर्ज. शेतकऱ्यांचे नाव जमिन धारणेचा 7/12 दाखला व 8-अ उतारावर असणे आवश्यक आहे.
    • शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकारीने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड व लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.
    अ.क्र घटक मंजूर तरतूद (रु.लाख) प्रति युनिट अनुदानाचा दर (रु.लाख) एकूण लाभार्थी संख्या
    1 विद्युत पंप (5 HP) 15 0.08 187
    2 कडबा कुट्टी यंत्र 30 0.16 187
    3 ट्रॅक्टर (8-70 HP) 150 1.25 (SC/ST/महिला/अल्प-अल्प भूधारक) <br> 1.00 (बहुभूधारक) 120
    4 रोटा वेटर 30 0.28 107
    5 कृषि मेळावे, प्रशिक्षण,प्रक्षेत्र भेटी 10 0.05 200
    6 गळीत धान्य/कडधान्य विणणे 20 50% अनुदानावर तुडतुड, जर्सीद, तुडतुड व हंसरा बिमाणे वापर करणे.
    7 अपघात व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत 25 0.10 (अपघातग्रस्त) / 0.25 (आत्महत्याग्रस्त )
    8 बायोगॅस संयंत्र 10 0.05 200

     

    ) योजनेचे नाव- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तुती लागवड व रेशीम उद्योग

    योजनेचा उद्देश-

    • नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुख्य शेतीबरोबरच पूरक व्यवसायाला चालना देणे.
    • ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उत्पन्न वाढवणे आणि शेतीतील अनिश्चिततेवर तोडगा काढणे.

    लाभार्थी निवड व निकष-

    • कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त 5 एकर क्षेत्र आवश्यक. (अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य)
    • तुती लागवडीसाठी पाण्याचा स्त्रोत आवश्यक.

    शासनाकडून मिळणारे अनुदान (3 वर्षात मिळणारे)

    बाब अकुशल अनुदान (रु) कुशल अनुदान (रु) एकूण अनुदान (रु)
    तुती लागवड 1,86,186/- 32,000/- 2,18,186/-
    किटक संगोपन गृह बांधकाम 58,149/- 1,21,000/- 1,79,149/-
    एकूण 2,44,335/- 1,53,000/- 3,97,335/-

     

    तालुकानिहाय घेतलेल्या बॅचेस व मिळालेले उत्पन्न (रु)

    अ.क्र. तालुका लाभार्थी संख्या घेतलेल्या बॅचेसची संख्या मिळालेले उत्पन्न (रु)
    1 पेठ 18 46 1260728
    2 इगतपुरी 15 41 1247500
    3 येवला 2 10 457000
    4 कळवण 3 14 268574
    5 दिंडोरी 4 5 61210
    6 निफाड 6 17 682542
    7 सिन्नर 12 37 1735149
    8 त्र्यंबकेश्वर 28 110 4759699
    9 मालेगाव 2 12 985022
    10 नाशिक 2 8 195000
    11 देवळा 2 2 60000
    12 चांदवड 0 0 0
    13 सटाणा 1 1 35500
    एकूण 95 303 11747924

    राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

    महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणारे कृषि विषयक पुरस्कार
    अ.क्र. पुरस्काराचे नाव निवडीची पात्रता प्रस्ताव सादर करण्याची पध्द्त निवड समिती
    डॉ.पंजाबराव देशमुख कृषि रत्न सर्वसाधारणपणे २०-२५ वर्ष शेतीचा अनुभव असणा-या व्यक्तीस/संस्थेस हा पुरस्कार दिला जातो. कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    वंसतराव नाईक कृषि भुषण
    1. शेती क्षेत्रात उल्लेखनिय कमगीरी करणा-या संस्थेस तसेच शेतक-यास पुरस्कार दिला जातेा.
    2. शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतक-यांना कृषि भुषण पुरस्कार दिला जातो
    3. याआधी दिलेल्या कृषि पुरस्कारास ५ वर्ष पुर्ण झालेली असावी.
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    जिजामाता कृषिभुषण
    1. शेती क्षेत्रात उल्लेखनिय कमगीरी करणा-या महिला शेतक-यास पुरस्कार दिला जातेा.
    2. याआधी दिलेल्या कृषि पुरस्कारास ५ वर्ष पुर्ण झालेली असावी.
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    उद्यान पंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणा-या शेतकरी,संशोधन संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो.
    वंसतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी शेती क्षेत्रात किमान ३ वर्ष उल्लेखनिय काम करणा-या शेतक-यांना हा पुरस्कार दिला जातो. तालुकास्तरीय निवड समिती-सभापती पंचायत समिती,मंडळ कृषि अधिकारी ताकृअ कार्यालय,पशुधन अधिकारी पं.समिती,कृषि अधिकारी पं.समिती व तालुका कृषि अधिकारी. जिल्हास्तरीय समिती-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी,सरव्यवस्थापक पणन मंडळ
    वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार
    1. स्वतः शेतकरी नसताना शेती क्षेत्रात विषेश योगदान असणारी व्यक्ती अथवा संस्था यांना हा पुरस्कार दिला जातेा.
    2. किमान १० वर्षाचा शेती किवा संलग्न क्षेत्राचा अनुभव
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.

    पिकस्पर्धा-

    1. .सर्वसाधारण गटात १० स्पर्धक
    2. .आदिवासी गटात ५ स्पर्धक(तालुका पातळी,जिल्हा पातळी,राज्य पातळी)
    3. .बक्षिस रक्कम-पं.स.पातळी पहिले बक्षिस रु.२५००/-,दुसरे बक्षिस रु.१५००/-,तिसरे बक्षिस रु.१०००/-
    4. .जिल्हा पातळी-पहिले बक्षिस रु.५०००/-,दुसरे बक्षिस रु.३०००/-,तिसरे बक्षिस रु.२०००/-
    5. .राज्य पातळी–पहिले बक्षिस रु.१००००/-,दुसरे बक्षिस रु.७०००/-,तिसरे बक्षिस रु.५०००/-
    1. .खातेदार असवा
    2. .स्पर्धेसाठी अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
    3. .तालुका पातळी २०/- आदिवासी स्पर्धकसाठी रु.१०/-
    4. .जिल्हा पातळी २० ते४०
    5. .राज्य पातळी ३० ते६०
    6. .स्पर्धसाठी सर्वसाधारण गटासाठी १० शेतकरी आदिवासी गटासाठी ०५ शेतकरी.
    गट स्तरावरुन जिल्हा व राज्य पातळी पिक स्पर्धा अर्ज प्राप्त करुन सादर करण्यात येतात. तालुका स्तर सभापती/गट विकास अधिकारी, जिल्हा पातळी अध्यक्ष जिल्हा परिषद,कृषि विकास अधिाकरी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यपातळी आयुक्त स्तर.

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    संपर्क:-

    दूरध्वनी क्रमांक :-0253 2598553

    भ्रमणध्वनी क्रमांक :-8329739783

    शेतकऱ्यांना जिल्ह्यातील खतांची माहिती मिळवण्यासाठी blogspot-

    https://krushivibhag11.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_34.html