बंद

    कृषी विभाग

    संजय शेवाळे
    श्री. संजय आबाजी शेवाळे कृषी विकास अधिकारी

    भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेती उत्पादनवाढीची गरज 19व्या शतकातच जाणवू लागली. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः 1950 ते 1965 या कालावधीत शेती क्षेत्राचा विस्तार, सिंचनाखालील क्षेत्रवाढ, तसेच रासायनिक खतांचा वापर यावर भर देण्यात आला. याच काळात शेती विकासासाठी अबनेक योजना राबविण्यात आल्या.सन 1965-66 पासून संकरीत वाण निर्मितीमुळे देशात हरितक्रांतीचा पाया घालण्यात आला. त्यानंतरच्या पंचवार्षिक योजनांमध्ये सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचन या घटकांच्या वापरामुळे शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. कृषि विद्यापीठांमार्फत सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रात्यक्षिके, प्रचारसभा, मेळावे, प्रदर्शने अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

    अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असलो तरी केवळ स्वयंपूर्णतेपेक्षा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, व्यापारक्षम शेतीचा विकास करणे, निर्यात वाढविणे आणि कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जागतिक व्यापार व्यवस्थेचा लाभ घेऊन भारतीय शेतीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणे हे आजचे उद्दिष्ट ठरले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागात असलेल्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद कृषी विभाग महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते व औजारे शेतकऱ्यांना लक्षांक निहाय उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन दिले जाते.

    जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची रचना पुढीलप्रमाणे आहे – कृषी विकास अधिकारी हे विभागाचे सदस्य सचिव कार्यान्वित योजनांचे तसेच अधिनस्त जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) हे सेस निधीतून राबवल्या जाणाऱ्या योजनांचे नियंत्रण तसेच कर्मचारी आस्थापनाविषयक कामकाज, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांच्या मार्फत विशेष घटक योजनांची अंमलबजावणी तालुका स्तरावर केली जाते.

    कृषि विभागाचे व्हिजन आणि मिशन म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणे व कृषि क्षेत्राचा विस्तार करणे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून प्रभावीपणे राबविणे हे उद्दीष्ट आहे.कृषि विभागामार्फत सर्व हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशके यांचे गुणनियंत्रण आणि पुरवठा याबाबत  नियोजन केले जाते. नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मग्रारोहयो या योजनेतून तुती लागवड व रेशीम उद्योग हे उपक्रम राबव‍िण्यात येतात.नाशिक जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असून, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, शासकीय योजना, तसेच स्थानिक निधीतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्दिष्टातून शेतकऱ्यांना समृद्धीच्या दिशेने नेण्याचे कार्य हा विभाग यशस्वीपणे पार पाडत आहे.

    1.3 उद्दिष्टे

    1. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावून त्यांचे राहणीमान उंचावणे.

    2.शेतकऱ्यांना  आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.

    1. शेतकरी बांधवांना शेती व शेती पूरक क्षेत्रातून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे.
    2. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचिवणे.
    3. आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून त्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान उंचाविणे.
    4. शेतकऱ्यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे.
    5. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.
    6. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून प्रभावीपणे राबविणे.
    योजना
    अ.क्र. योजनेचे नांव योजनेचे स्वरुप / माहिती योजनेत सहभागाच्या अटी,शर्ती व पात्रता
    आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आदिवासी योजना (टीएसपी)
    1. .जमिन सुधारणा ४०,०००/-रु.अनुदान मर्यादा
    2. .निविष्ठा ५,०००/-रु. अनुदान मर्यादा
    3. .सुधारीत शेती औजारे १००००/-रु. अनुदान मर्यादा
    4. .बैलजोडी ३००००/-रु. अनुदान मर्यादा
    5. .बैलगाडी १५०००/-रु. अनुदान मर्यादा
    6. .जुनी विहिर दुरुस्ती ३००००/-रु. अनुदान
      मर्यादा
    7. .इनवेल बोअरींग २००००/-रु. अनुदान मर्यादा
    8. .पाईपलाईन २००००/-रु. अनुदान मर्यादा
    9. .पंपसंच २००००/-रु. अनुदान मर्यादा
    10. .नविन विहिर ७०००० ते १०००००रु. अनुदान
      मर्यादा
    11. .शेततळे ३५०००/-रु. अनुदान मर्यादा
    12. . परसबाग २०० रु. अनुदान मर्यादा
      प्रती लाभार्थी
    13. .तुषार ठिबक सिचंन संच २५०००/-रु.अनुदान
    1. .जमीन धारणा-स्वतःच्या नावे ६.०० हेक्टर किवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी. जमीन धारणेचा दाखला ७/१२ व ८-अ मध्ये घेण्यांत यावा.
    2. .जातीचा दाखला- लाभार्थी हा आदिवासी शेतकरी असला पाहिजे.दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये ज्या आदिवासी जमातीच्या व्यक्तीचे नांव असेल त्याला ग्रामसेवक/तलाठी/गट विकास अधिकारी यांच्या सहीचे कागदपत्र चालतात.
    3. .उत्पन्नाचा दाखला- ज्या लाभार्थी शेतक-यांचे सर्व मार्गानी मिळणारे आर्थिक उत्पन्न रु.२५,०००/- पर्यत आहे अशा शेतक-यांना लाभ दिला जातो.
    आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना (ओटीएसपी)

    योजनेचा उदेश :- महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतक-यांना शेतीसाठी अर्थसहाय्य योजने अंतर्गत जमीन सुधारणा व त्यांचे शेतातील उत्पन्नात वाढ करणे.
    उदेश :- अनुसुचित जाती व नवबौध्द शेतक-यांचे उत्पादन वाढवून त्यांची आर्थिक उन्नती करणे.

    अनुसुचित जाती उपयोजना (वि.घ.यो.) सन २०१५-२०१६
    अ.क्र. योजनेचे नांव योजनेचे स्वरुप / माहिती योजनेत सहभागाच्या अटी,शर्ती व पात्रता
    अनुसूचीत जाती उपयोजना (SCP)(विशेष घटक योजना)
    1. .जमिन सुधारणा ४०,०००/-रु. अनुदान मर्यादा
    2. .निविष्ठा ५,०००/-रु.अनुदान मर्यादा
    3. .सुधारीत शेती औजारे १०,०००/-अनुदान
      मर्यादा
    4. .बैलजोडी ३०,०००/-रु.अनुदान मर्यादा
    5. .बैलगाडी १५,०००/-रु.अनुदान मर्यादा
    6. .जुनी विहिर दुरुस्ती ३०,०००/-रु.अनुदान
      मर्यादा
    7. .इनवेल बोअरींग २०,०००/-रु.अनुदान
      मर्यादा
    8. .पाईपलाईन २०,०००/-रु.अनुदान मर्यादा
    9. .पंपसंच २०,०००/-रु.अनुदान मर्यादा
    10. .नविनविहिररू.७०,०००ते१,००,०००/-रु.
      अनुदान मर्यादा
    11. .शेततळे ३५,०००/-रु.अनुदान मर्यादा
    12. .परसबाग २०० रु.अनुदान मर्यादा
      प्रती लाभार्थी
    13. .तुषार ठिबक सिचंन संच २५,०००/-रु.
      अनुदान मर्यादा
    14. .ताडपत्री १०,०००/- रु.अनुदान मर्यादा

    नविन विहिर या बाबी साठी
    रु.१०००००/- पर्यंत अनुदान देय आहे.
    विहिर व्यतीरीक्त इतर घटकांचा लाभ
    घेणा-या लाभार्थीसाठी रु.५००००/-
    अनुदान मर्यादा आहे. प्रत्येक बाबींसाठी
    १०० % अनुदान देय आहे.

    1. .जमीन धारणा-स्वतःच्या नावे ६.०० हेक्टर किवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी.जमीन धारणेचा दाखला ७/१२ व ८-अ मध्ये दाखला आवश्यक
    2. .जातीचा दाखला- लाभार्थी हा अनुसूचीत जाती / नवबौध्द शेतकरी असावा.दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये ज्या अनुसुचित जातीच्या / नवबौध्द व्यक्तीचे नांव असेल त्याला ग्रामसेवक/तलाठी/गट विकास अधिकारी यांच्या सहीचे कागदपत्र ग्राहय धरले जातील.
    3. .उत्पन्नाचा दाखला- ज्या लाभार्थी शेतक-यांचे सर्व मार्गानी मिळणारे आर्थिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यत आहे अशा शेतक-यांना लाभ दिला जातो.

    योजने संबधीत अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर पंचायत समितीत कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क साधावा.

    राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

    महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणारे कृषि विषयक पुरस्कार
    अ.क्र. पुरस्काराचे नाव निवडीची पात्रता प्रस्ताव सादर करण्याची पध्द्त निवड समिती
    डॉ.पंजाबराव देशमुख कृषि रत्न सर्वसाधारणपणे २०-२५ वर्ष शेतीचा अनुभव असणा-या व्यक्तीस/संस्थेस हा पुरस्कार दिला जातो. कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    वंसतराव नाईक कृषि भुषण
    1. शेती क्षेत्रात उल्लेखनिय कमगीरी करणा-या संस्थेस तसेच शेतक-यास पुरस्कार दिला जातेा.
    2. शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतक-यांना कृषि भुषण पुरस्कार दिला जातो
    3. याआधी दिलेल्या कृषि पुरस्कारास ५ वर्ष पुर्ण झालेली असावी.
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    जिजामाता कृषिभुषण
    1. शेती क्षेत्रात उल्लेखनिय कमगीरी करणा-या महिला शेतक-यास पुरस्कार दिला जातेा.
    2. याआधी दिलेल्या कृषि पुरस्कारास ५ वर्ष पुर्ण झालेली असावी.
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.
    उद्यान पंडीत पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणा-या शेतकरी,संशोधन संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो.
    वंसतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी शेती क्षेत्रात किमान ३ वर्ष उल्लेखनिय काम करणा-या शेतक-यांना हा पुरस्कार दिला जातो. तालुकास्तरीय निवड समिती-सभापती पंचायत समिती,मंडळ कृषि अधिकारी ताकृअ कार्यालय,पशुधन अधिकारी पं.समिती,कृषि अधिकारी पं.समिती व तालुका कृषि अधिकारी. जिल्हास्तरीय समिती-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी,सरव्यवस्थापक पणन मंडळ
    वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार
    1. स्वतः शेतकरी नसताना शेती क्षेत्रात विषेश योगदान असणारी व्यक्ती अथवा संस्था यांना हा पुरस्कार दिला जातेा.
    2. किमान १० वर्षाचा शेती किवा संलग्न क्षेत्राचा अनुभव
    कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कडुन विकृससं मार्फत म.आयुक्त (कृषि) पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला जातो. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,जिल्हा पशुसंवंर्धन अधिकारी,प्रकल्प संचालक आत्मा,कृषि विकास अधिकारी.

    पिकस्पर्धा-

    1. .सर्वसाधारण गटात १० स्पर्धक
    2. .आदिवासी गटात ५ स्पर्धक(तालुका पातळी,जिल्हा पातळी,राज्य पातळी)
    3. .बक्षिस रक्कम-पं.स.पातळी पहिले बक्षिस रु.२५००/-,दुसरे बक्षिस रु.१५००/-,तिसरे बक्षिस रु.१०००/-
    4. .जिल्हा पातळी-पहिले बक्षिस रु.५०००/-,दुसरे बक्षिस रु.३०००/-,तिसरे बक्षिस रु.२०००/-
    5. .राज्य पातळी–पहिले बक्षिस रु.१००००/-,दुसरे बक्षिस रु.७०००/-,तिसरे बक्षिस रु.५०००/-
    1. .खातेदार असवा
    2. .स्पर्धेसाठी अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
    3. .तालुका पातळी २०/- आदिवासी स्पर्धकसाठी रु.१०/-
    4. .जिल्हा पातळी २० ते४०
    5. .राज्य पातळी ३० ते६०
    6. .स्पर्धसाठी सर्वसाधारण गटासाठी १० शेतकरी आदिवासी गटासाठी ०५ शेतकरी.
    गट स्तरावरुन जिल्हा व राज्य पातळी पिक स्पर्धा अर्ज प्राप्त करुन सादर करण्यात येतात. तालुका स्तर सभापती/गट विकास अधिकारी, जिल्हा पातळी अध्यक्ष जिल्हा परिषद,कृषि विकास अधिाकरी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यपातळी आयुक्त स्तर.