विविध योजना व त्यांची सविस्तर माहिती-
1) “राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना”
योजनेचे स्वरुप / माहिती :विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील इ. १ली पासुन १२वी पर्यंत शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांसाठी व सर्व विभागांच्या शाळांसाठी सदरची योजना आहे.
१) या योजनेन्वये अर्जदाराने तीन प्रति अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक नमूद कागदपत्रे जोडावीत.अर्ज संबधित शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेमार्फत गटशिक्षणाधिका-यांकडेस सादर करावेत.
२) अर्जावर संबधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी छाननी करुन योग्य कागदपत्रे, शिफारशिसह व सहीशिक्कयांसह एक प्रत संबधित गशिअ व दुसरी प्रत इ.१ली ते ८वी साठी शिक्षणाधिकारी (प्राथ) व इ. ९वी ते १२वी साठी शिक्षणाधिकारी (माध्य) यांचेकडे अर्ज १५ दिवसाचे आत पाठवावे.
३) प्राप्त अर्जाची संबधित गशिअ यांनी ३० दिवसात छाननी करुन आवश्यक त्या शिफारशिसह म.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीपुढे ठेवण्यासाठी संबधित शिक्षणाधिकारी यांचेकडेस सादर करावेत.
४) संबधित शिक्षणाधिकारी यांनी प्राप्त दाव्यांची माहिती तहसिलदारांच्या शिफारशिसह ३० दिवसांच्या आत समितीपुढे सादर करुन निकाली काढावीत.
योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती :
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. पीआरई/२०११/प्रक्र२४९/प्राशि १ दि. ०१/१०/२०१३ अन्वये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना इ. १ ली ते १२ पर्यंत शिकणा-या सर्व मुलामुलींना लागू करण्यात आली आहे.
१) या योजनेखाली विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास ७५०००/-
२) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव, २ डोळे, १ अवयव व १ डोळा) निकामी झाल्यास ५००००/-
३) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव व १ डोळा) कायमस्वरुपी निकामी झाल्यास रु.३००००/-
सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. सदरचे प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीमार्फत मंजूर केले जातात. सदरचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेमार्फत दिला जातो. सदर योजनेचा लाभ मंजूरीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.
१) प्रथम खबरी अहवाल
२) घटनास्थळ पंचनामा
३) इन्व्हेस्ट पंचनामा
४) सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरी केलेला शवविच्छेदन अहवाल
५) सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरी केलेला मृत्युदाखला.
६) अपंगत्वाबाबत सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे अंतिम प्रमाणपत्र.
2) “अल्पसंख्यांक योजना” अ)
योजनेचे स्वरुप / माहिती : योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती :
निकष – या योजनेमध्ये विद्यार्थी अल्पसंख्याक समाजाचा असणे आवश्यक आहे. उदा. मुस्लिम, शीख, पारशी, जैन, बौध्द, ख्रिश्चन इ.
१) इ. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवीला जातो.
२) इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीकरीता पालकांना प्रोस्ताहन भत्ता दिला जातेा.
३) इ. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
2) अल्पसंख्यांक योजना ब)-
योजनेचे स्वरुप / माहिती : योजनेत सहभागी लाभार्थी अटी व शर्ती :
निकष – विद्यार्थ्याना मोफत गणवेश (इ.१ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यानां ) पुरविला जातो.
स्वरुप :- शैक्षणिकदृष्टया मागास भागातील प्राथमिक शाळेतील अनुसुचीत जाती/जमातीच्या भटक्या जाती व विमुक्त जमातीतील व इमावच्या इयत्ता १ ली ते ४ थी मधील विदयार्थ्याना गणवेश व साहित्य पुरवणेसाठीची योजना सन १९७७ पासुन राबविण्यात येत आहे.
योजनेत सहभागी लाभार्थी अटी व शर्ती :-
शैक्षणिक दृष्टया मागास भागातील प्राथमिक शाळेतील अनुसुचित जाती जमातीच्या १ ली ते ४ थी मधील विदयार्थी यांना लाभ देण्यात येतो सदर योजनेसाठी प्राप्त अनुदाना पैकी ८०* रक्कम गणवेशासाठी व २०* रक्कम लेखन साहित्यासाठी देण्यात येते शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील शासन निर्णय क्रमांक सकिर्ण-२०१३ ( ६७/१३) प्राशि-५ दिनांक ३१/१०/२०१३ अन्वये समग्र शिक्षा योजने या केंद्र शासन पुरस्कृत योजने अंतर्गत शालेय विदयार्थ्याना मोफत गणवेश पुरविणे ही योजना शासन दिनांक ०४/०२/२०११ अन्वये सुरु करण्यात आल्याने दोन्ही योजनांची व्दिरुक्ती (Duplication) होवु नये म्हणुन राज्य शासनाकडील सदरची योजना दिनांक ३१/१०/२०१३ पासुन बंद करण्यात आली आहे.
३) “दारिद्रय रेषेखालील विदयार्थीनीना उपस्थिती भत्ता”
स्वरुप : दारिद्रय रेषेखालील इ.१ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यानां उपस्थिती भत्ता शाळास्तरावर देणे.
इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणार्या अनुसचित जाती,अनुसुचित जमाती,भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विदयार्थीनीना नियमित शाळेत जाण्यासाठी प्रति दिनी १ रुपया प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो.
योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती :
इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणार्या अनुसचित जाती,अनुसुचित जमाती,भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विदयार्थीनीना लाभ देण्यात येतो.
४) “शालेय पोषण आहार योजना (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (केंद्र शासन पुरस्कृत योजना )”
योजनेचे स्वरुप व माहिती :शालेय पोषणआहार हि केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सदर योजना दि. २२ नोव्हेंबर १९९५ पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत इ. १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह ३ किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता.
सन २००१ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे असे आदेश दिले व त्यानुसार जून २००२ पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देण्यात येतो. 08 ऑगस्ट २००८ पासून योजनेचा विस्तार करण्यात येवून इ. ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
शालेय पोषण आहार योजना सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय क्रमांक शापोआ/२००९/प्रक्र १३६/राशी४/ दिनांक १८/६/२००९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात तांदुळ व इतर धान्यादी मालाचा उदा. तांदुळ, कडधान्य, तेल मिठ, कांदा लसूण मसाला, हळद, मोहोरी इ. पुरवठा शाळांना करण्यात येतो. तर शहरी भागात पुरवठादारामार्फत तांदुळांची वाहतुक करुन केंद्रिय स्वयंपाक गृहांना तांदुळाचा पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मालाचा पुरवठा हा महाराष्ट्र स्टेट को-ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन मार्फत करण्यात येतो.
योजनेची ठळक वैशिष्टे :
१) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
२) प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोदंणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे
३) शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.
अनुदानाचे प्रमाण- केंद्हिस्सा-60% राज्यहिस्सा -40%
शासन निर्णय क्रमांक शापोआ-2022/प्र.क्र.117/एस.डी.3 दि.11/06/2024 व मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे परिपत्रक क्र.प्राशिस/पीएमपोषण/2024-25/04385 दि.25/06/2024 अन्वये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविधता आणून विद्यार्थ्यांना सुधारीत पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी 1 याप्रामाणे 12 पाककृती व तीन संरचित आहार डाळी व कडधान्यापासून तयार केलेले आहार (स्प्राऊट्स) तांदुळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश करुन नवीन पाककृती निचत केलेली आहे.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ :
शिजवून देण्यात येणा-या आहारात खालीलप्रमाणे धान्य, कडधान्ये व भाजीपाल्याचे वजन खालीलप्रमाणे –
इ. १ ली ते ५ वी | इ. ६ वी ते ८ वी | ||
तांदूळ | १०० ग्रॅम | तांदूळ | १५० ग्रॅम |
डाळ/कडधान्य | २० ग्रॅम | डाळ/कडधान्य | 3० ग्रॅम |
तेल | ०५ ग्रॅम | तेल | ७.५ ग्रॅम |
मसाले व इतर | ०२ ते ०५ ग्रॅम | मसाले व इतर | ०३ ते ०७ ग्रॅम |
भाजीपाला | ५० ग्रॅम | भाजीपाला | ७५ ग्रॅम |
इ. १ ली ते ५ वी शिजविलेल्या अन्नांमध्ये ४५० कॅलरीज (उष्मांक) व १२ ग्रॅम प्रथिने युक्त पोषण आहार देण्यात येतो. तसेच इ. ६ वी ते ८ वी शिजविलेल्या अन्नामध्ये ७०० कॅलरीज (उष्मांक) व २० ग्रॅम प्रथिने युक्त पोषण आहार देण्यात येतो.
योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती :
ग्रामीण भागात शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शासकिय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजविण्याचे काम महिला बचत गट, गरजू महिला (स्वयंपाकी/मदतनीस) यांचेकडून केले जाते. नागरी भागामध्ये शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृहमार्फत राबविली जाते.
शासननिर्णय शापोआ-2021/प्र.क्र.145/एस.डी.3दि.4 नोव्हेंबर 2022 अन्वये केंद्रपुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्तीनिर्माण योजना (P M-POSHAN) असे करण्यात आले.
५) “सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना”
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आदिवासी विकास विभाग शासन निर्णय शिष्यवृ/2017/प्र.क्र.134 /का.12 /दि.17.04.2018 अन्वये ग्रामविकास विभाग / जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या शासन निर्णयात या योजनेचे पुढीलप्रमाणे स्वरुप व निकष दिलेले आहेत.
योजनेचे स्वरुप:-राज्यातील अनुदानित /विना अनुदानित, प्राथमिक,माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळांमध्ये इ.1 ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. सदरची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
इ. 1 ते 4 थी रु.1000/- प्रतिविद्यार्थी
इ. 5 ते 7वी रु.1500/- प्रतिविद्यार्थी
इ. 7 ते 10वी रु.2000/- प्रतिविद्यार्थी
योजनेचे निकष :-
1) अनुदानित /विना अनुदानित , प्राथमिक ,माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालि व महानगरपालिका शाळांमध्ये इ.1 ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजने अतर्गंत लाभ घेता येईल.
2) अनुसूचित जमातीच्या विद्यांर्थ्यांची उपस्थिती प्रतिमाह 80 % असणे आवश्यक आहे.
3) शासकिय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
4) नामांकित शाळांमध्ये ,सैनिकी शाळांमध्ये, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या मध्ये
शासनाकडून त्यांच्या शिक्षणाचा खर्च अदाकरण्यात येतो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय राहणारनाही.
5) त्या विद्यार्थ्यांचे पालक शासकिय, निमशासकिय (केंद्र व राज्य शासन ) व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
केंद्र व राज्य शासन अनुदानित संस्थांमध्ये सेवा करत आहेत, ज्यांच्या कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.08 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
6) नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेमध्ये दुसऱ्यांदासदर योजनेंतर्गंत लाभ अनुज्ञेय राहणार नाही.पंरतु सदर नापास विद्यार्थी पास होऊनत्यांनी वरच्या इयत्तेत प्रवेश मिळविल्यास त्यांना त्या इयत्तेमध्ये या शिष्यवृत्ती योजनेतर्गंत लाभ देय राहील.
६) “समग्र शिक्षा योजना (केंद्र शासन पुरस्कृत योजना)”
समग्र शिक्षा, योजनेचे स्वरुप :- केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा, हे केंद्र शासनाने शालेय व्यवस्थापनामध्ये समाजाच्या सक्रिय सहभागाव्दारे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट कालबध्द रितीने गाठण्यासाठी तयार केलेला कालबध्द कार्यक्रम आहे.
उद्दिष्ट :–
- प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी कालबध्द कार्यक्रम राबविणे.
- 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, टिकविणे, व गुणवत्तापूर्ण दर्जेदार शालेय शिक्षण उपलब्ध करुन देणे.
- समाजाचा,वस्तीच्या किंवा स्थानिक लोकांच्या शालेय व्यवस्थापनातील सक्रिय सहभागाव्दारे समाजिक, प्रादेशिक आणि लिंगविषयक (स्त्री–पुरुष) भेदभाव कमी करणे.
- शालेय विकासात समाजाचा सहभाग वाढविणे.