बंद

    पंचायत समिती, येवला

    संदिप वायाळ
    श्री संदिप दिलीप वायाळ

    गट विकास अधिकारी

    येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.

    इ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्यात झाला.

    “मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ” ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. नाशिक जिलह्यामधील एक दुष्काळी तालुका म्हणून देखील ओळख आहे कांदा पीक इथे मोठ्या प्रमाणत घेतले जाते.

    भौगोलिक माहिती– येवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तिची स्थापना इ.स १८५३ साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी तसेच शिर्डी पासून उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश २० .० ३ व रेखांश ७४.४३. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरून ५६० मी उंचीवर आहे. येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत.

    (सविस्तर वाचा)

     

     

    ई मेल आईडी- bdoyeola@gmail.com

     गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक- ९९२२४६२९५६